Posts

आता तरी थोडं शाहन व्हा राजहो

राजकारण , दुनियादारी, पक्ष , आंदोलनं, मोर्चे हे आपल्यासाठी नाही बाबाहो, आपण काल पण सर्वसामान्य होतो आज सर्वसामान्य आहोत आणि कदाचित उद्याही असू, कदाचित म्हणतोय ते एवढ्या साठी की जर आपण आतापण शहाणे नाही झालो तर आपण सर्वसामान्य पण असू का हा मोठा प्रश्न आहे..   कुणाच्याही घोषणा दिल्या तरी शेवटी भाकरी आपल्याच घरी , कोणी कोणच घर नाही चालवत मित्रांनो , राजकारण हा आपल्या समजला शापच जणू , करिअर घडवायच्या दिवसात आम्ही समाज घडवायला निघतो बर समाज म्हणजे कोण ओ आपणच ना म अगोदर स्वतःला घडवणं महत्वाचं नाही का ?   बर आपण मोर्चे करू मांडवली ते करणार आपण आंदोलन करू मंत्री पद त्यांच्या पोरांना भेटणार आपण झेंडे मिरवू रुबाब त्यांचा वाढणार, हे कुठं तरी थांबायला हवं असं नाही वाटत का ??   बर सरकारी नोकरीचा प्रश्न आला की तुम्ही आरक्षणाच भूत समोर आणता पण एक विसरता हे असताना ही स्पर्धा करणारे आहेतच की ,   एखादा धंदा कर म्हटलं की आपली सुरुवात कुठून तर,  द्या एखादी चांगली आयडिया  मग मी करतो ,  अरे  लेका अस कुठं असतंय का?? कस आहे ना भाऊ गोष्टींचं ना वेडं असाल पाहिजे मग गोष्टी ज...

सुभेदार

 सुभेदार सांगना कुठून आणलं ओ एवढं धैर्य घरात पोराच्या लग्नाची हळद फुटतं असताना तुम्ही रक्ताची रंगपंचमी खेळली कोंढण्यावर... सुभेदार ! वरबाप म्हणून राजगडावर गेला आणि मोहिमेचा विडा घेऊन आला ... कस जमलं ओ तुम्हाला ? आधी लगीन कोंढण्याचं आणि मग रायबाचं अस छाती ठोकून  सांगायला ! माहिती होत उदयभान  काळ बनून बसलाय तिकडं पण सुभेदार तुम्ही मंजे वाघच की ! कोंढण्यावर निश्चयाची तलवार आणि काळजाची ढाल करून लढलात, काळी अभेद्य कातळ पण सुभेदार तुमच्या पुढ कायच अशक्य नाही ओ, त्या कातलीळा पण पायाखाली आणलं , सुभेदार कस जमलं निर्जीव कड्याला पण आपलंसं करायला... सुभेदार तुमची बाकी गोष्टच न्यारी, तुम्ही काय , शेलार मामा काय अन ते आपलं सूर्याजी तुमचीच सावली बर का, हिकडं तुम्ही पडला तर बहाद्दर दोर कापून आला,  काय म्हणावं त्यांना इकडे भाऊ पडला पण मोहीम फत्ते झाली पाहिजे ही जिद्द, सुभेदार कोणच्या मातीचे ओ तुम्ही.. लढला काय ,जिंकला काय अन कोंढण्याचा सिंहगड केला काय ?? सुभेदार स्वाभिमनाची मशाल, दोस्तीची मिशाल ,कर्तव्यचं तोरण,पराक्रमाची गुढी , विश्वासाचं सार्थक  काय काय नाही देऊन गेलात तुम्ही.....

मंडळातला कार्यकर्ता

काल कामानिमित्त पुण्यात गेलो होतो, सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची चाललेली धावपळ आपलाच बाप्पा सगळ्यात भारी असायला पाहिजे या दृष्टीने चालली चढाओढ सगळं चहाच्या सोबत पाहत होतो इतक्यात  सोबत असणारा माझा मित्र बोला की काय पण असुदेत मात्र  आपल्यातला कार्यकर्ता मेला नाही पाहिजे ...    म्हटलं कसला भारी बोलास भावा,  त्याच्या त्या वाक्याने ८ - ९ वर्षा पूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. तस आमचं गाव छोटसं आहे, निरा नदीच्या कुशीत आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर, जमतेम १०० - १५० उंबरठ्या च  टापरेवाडी माझं गाव ,  जस समजतंय तस आमच्याकडे एक गाव एक गणपती.    इयत्ता 9 वी पासून मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता ,   कसले बेभान ,मंतरलेले दिवस होते ते. रात्र रात्र जागून पूर्ण केलेलं डोकोरेशन आणि गणपती जाण्याचा दिवस आला तरी आमची चाललेली तयारी एक वेळीच दुनिया होती...    १५ ऑगस्टला मिटिंग झाली की आमची तयारी सुरू व्हायची अध्यक्ष पद वैगरे आमच्या साठी नाममात्र फक्त आपला कार्यक्रम जोरात झाला पाहिजे  एवढंच डोक्यात . पैसे म्हणाल तर अगदी जेमतेम मात्र तेवढ्य...

पाऊसकाळ कमी झालाय

 हल्ली सगळेच म्हणतायेत पाऊस काळ कमी झालाय, मी म्हणतो माणुस तरी कुठं हल्ली माणूस राहिलाय पावसाने बिचाऱ्याने तरी किती दिवस निःस्वार्थ बरसाव स्वार्थी माणसासाठी ?? तुम्हीच सांगा कुठं उरलेत कुठे डोंगर झाडी ढग अडवण्यासाठी      हरवत चाली मातीची ओल आणि ओढ      हरवलेल्या माणुसकी सारखी,      इथे कोणच नाही कोणाचं आणि नाही कोणाला कोणाची फिकर      म  सांगाना तिथंच कशी असें पावसाची हळवी सर... थोडे बहुत आपण पण नाती गोती जपायला पडतोय कमी म कुठं चुकलं पावसाचं जर त्यानेही पाऊसकाळ केला कमी आभार माना शेतकऱ्यांचं आणि वारकऱ्यांचे ज्यांच्यामुळे माणुसकी बाकी आहे थोडी, नाहीतर कसली ईर्षा कसली श्रीमंती कधीच पार झाली असती आपली होडी....       पहा थोडं विचार करून , जमतंय का माणूस म्हणून जगायला , माणुसकीचे ढग पुन्हा नात्यानं मध्ये पेरायला, जमलंच थोडे डोंगर आणि झाडी राखू पडेल पाऊस पहिल्या सारखा आपण पण पहिल्या सारख वागू ,आपण पण पहिल्या सारख वागू।।                         ...

सगळं आपल्या कवेत असतं 👍

सगळं आपल्या कवेत असत आपलं फक्त लक्ष नसत हारनं , जिंकणं, पडणं , उठणं, रडणं , हसणं.. सगळं सगळं म्हणजे अगदी सगळ... बस थोडं वेगळं जगता , राहता आणि विचार करता आलं पाहिजे... पहिल्यांदा चालताना सगळेच पडतात,                    म काय कोणी चालायचचं  शिकत नाही का ? आपण उगाच आधार शोधात बसतो आणि इथेच आपली गल्लत होते.. कारण आधारासोबत सहानुभूती येते आणि सहानुभुती सोबत सुरक्षितता आणि हीच सुरक्षितता म आपल्याला आपल्या चौकटी बाहेर पडू देत नाही आणि जोवर आपण तिच्या बाहेर पडत नाही तोवर जे पाहिजे ते आणि जस पाहिजे तस मिळवणं अवघड आहे..    ठेवा ना प्रयत्नांवर विश्वास , पडलात न तर असुदेत काय फरक पडतो हीच तर सुरुवात आहे रूजण्याची करण झाडालाही आकाशाशी स्पर्धा करायला बी म्हणून या मातीत गाडून घ्यावं लागतच की ... शेवटी आपण तर माणूस आहोत , विचार करण्याची नैसर्गिक दैवी देणगी आपल्याला अगदी मोफत मिळाली आहे , फक्त गरज आहे ती त्याचा योग्य उपयोग करायची.. अपयश आले म्हणून हताश होत असाल तर ठीक आहे , व्हायला पण पाहिजे पण हताश होऊन प्रयत्न सोडत आसताल तर म बाकी तुमचं...

आपलेपणाचे ढग

अथांग भरलेल्या आकाशात , आपले पणाचे  ढग दाटून यायला हवेत ...  कोणीच नसतं कोणाचं हे भ्रम आता तुटायला हवेत ....             बरसून द्यावं गैरसमजांच्या सरिंना , रुसव्याना  आणि आपलसं करावं दुरावलेल्या आपल्याना .... आयुष्य जगण्याची हि पण एक कला आहे कोणी नसला आपलं तरी आपण सर्वांचे आहोत यात एक वेगळीच मजा आहे ...  शेवटी पुन्हा एकदा आकाशात आपले पणाचे ढग  दाटून यायला हवेत ... ✍️ सुशांत