सगळं आपल्या कवेत असतं 👍
सगळं आपल्या कवेत असत आपलं फक्त लक्ष नसत हारनं , जिंकणं, पडणं , उठणं, रडणं , हसणं.. सगळं सगळं म्हणजे अगदी सगळ... बस थोडं वेगळं जगता , राहता आणि विचार करता आलं पाहिजे... पहिल्यांदा चालताना सगळेच पडतात, म काय कोणी चालायचचं शिकत नाही का ? आपण उगाच आधार शोधात बसतो आणि इथेच आपली गल्लत होते.. कारण आधारासोबत सहानुभूती येते आणि सहानुभुती सोबत सुरक्षितता आणि हीच सुरक्षितता म आपल्याला आपल्या चौकटी बाहेर पडू देत नाही आणि जोवर आपण तिच्या बाहेर पडत नाही तोवर जे पाहिजे ते आणि जस पाहिजे तस मिळवणं अवघड आहे.. ठेवा ना प्रयत्नांवर विश्वास , पडलात न तर असुदेत काय फरक पडतो हीच तर सुरुवात आहे रूजण्याची करण झाडालाही आकाशाशी स्पर्धा करायला बी म्हणून या मातीत गाडून घ्यावं लागतच की ... शेवटी आपण तर माणूस आहोत , विचार करण्याची नैसर्गिक दैवी देणगी आपल्याला अगदी मोफत मिळाली आहे , फक्त गरज आहे ती त्याचा योग्य उपयोग करायची.. अपयश आले म्हणून हताश होत असाल तर ठीक आहे , व्हायला पण पाहिजे पण हताश होऊन प्रयत्न सोडत आसताल तर म बाकी तुमचं...